India Vs Pakistan Cricket : ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर
आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दुबईत होणार आहे. भारतात होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडलेले आहेत. त्यामुळे या सामन्याची हजारो तिकिटं अजूनही विक्रीविनाच उपलब्ध असल्याची माहिती आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकेक सामना जिंकल्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावपूर्ण संबंधांचे प्रतिबिंब आहे.