High Court on Ulhasnagar : बेकायदेशीर बांधकाम हा न संपणारा आजार, कोर्टाचे ताशेरे

संपूर्ण उल्हासनगरच बेकायदा आहे का?, ते भारतात आणि मुंबईजवळ असूनही तिथे कायद्याचं काहीही चालत नाही, अशा शब्दात बेकायदेशीर बांधकामांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आधी बेकायदा बांधकाम करायचं आणि नंतर ते नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करायचा. त्यासाठी अपीलही दाखल करायचं. मग महापालिकेने कारवाई सुरु केली की ती थांबवण्यासाठी न्यायालयात धाव घ्यायची, हे सारं आता नेहमीचंच झालेलं आहे, असे खडेबोलही हायकोर्टाने सुनावले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola