तोक्ते चक्रीवादळाचे कोकणात रौद्ररुप, घरांची छप्परं उडाली, फळबागा जमीनदोस्त,तर अनेक ठिकाणची बत्ती गुल

Continues below advertisement

सिंधुदुर्ग/रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर आदळलं. चक्रीवादळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळाले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील वीज खंडीत झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram