Ratnagiri Rain Updates : कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग ; रत्नागिरीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या काही काळ विश्रांती घेतलेला वरुणराजा जोराने बरसत आहे असं चित्र आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून काही नद्या या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, समुद्रालाही उधाण येत असून खाडी आणि समुद्रकिनारच्या नागरिकांना देखील याबाबतच्या सूचना केल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola