Bhusaval Rain : मध्यरेल्वे मार्गाच्या रुळाखालचा भराव गेला वाहून, अनेक गाड्या 3 ते 13 तास उशीरानं

Continues below advertisement

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मुसळधार पाऊस झालाय. या  पावसाने रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झालाय. काल रात्रीपासून अनेक गाड्या ३ ते १३ तास विलंबाने धावत असल्याने अनेक प्रवाशी मनमाड स्थानकात अडकून पडलेत. त्यांच्यावर तेथेच ताटकळत थांबत गाड्यांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. तसेच, वर्धा-भुसावळ मेमू व नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram