Heavy Rain Nashik | Godavari नदीला पूर, आरती साहित्य कंटेनर वाहून गेला!

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. गोदावरी नदीला पूर आला असून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीत आरती आणि पूजेसाठी लागणारे साहित्य ठेवणारा एक कंटेनर वाहून गेला आहे. हा कंटेनर म्हणजे एक छोटेखानी दुकानच होते. सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाऊ नये असे आवाहन केले आहे. नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असेही प्रशासनाने सूचित केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola