Uttarakhand : मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर Harak Singh Rawat यांना अश्रू अनावर

Continues below advertisement

उत्तराखंडमध्ये मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेले मंत्री हरकसिंह रावत यांना अश्रू अनावर झाले. पक्षानं एवढा मोठा निर्णय घेण्याआधी विचारलं देखिल नाही असं सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 2017 च्या निवडणुकीआधी हरकसिंह रावत यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी ते त्यांच्याशिवाय सुनेसाठीही तिकीट मागत होते. पण एकाच घरात दोघांना उमेदवारी देता येणार नाही असं सांगत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं. गेले अनेक दिवस ते पक्षाविरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. आता काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं रावत यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram