Konkan Mango : बदलतं हवामान, यंदा हापूसची चव चाखायला उशीर होणार? Special Report

Continues below advertisement
कोकणातील (Konkan) हापूस आंब्याच्या (Hapus Mango) हंगामावर हवामान बदलाचे (Climate Change) संकट ओढवले आहे, ज्यामुळे यंदा हापूसप्रेमींना आंब्याची चव घेण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार आहे. 'कडाक्याची थंडी जर पडली नाही तर हा आंब्याचा सीझन आणखी लांबणार, म्हणजे महिना नाहीये कदाचित दीड दोन महिने सुद्धा लांबणार,' असा अंदाज एका स्थानिक बागायतदाराने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी कोकणात सुरू असलेल्या अवकाळी आणि जोरदार पावसामुळे आंब्याच्या मोहोरासाठी आवश्यक असलेली थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. या बदलामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली असून, जानेवारीत बाजारात दाखल होणारा हापूस आता मार्चपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri) आणि रायगड (Raigad) या प्रमुख आंबा उत्पादक जिल्ह्यांमधील शेतकरी या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola