Kanchan Giri on Raj Thackeray : परप्रांतीयांना केलेल्या मारहाणीबाबत खेद व्यक्त केला होता : कांचनगिरी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे, त्यांच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा दिला... तर राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हीडिओला आज बृजभूषण यांना आण रे तो पीडित असं म्हणत २००८ साली मनसेनं मारहाण केलेल्या उत्तर भारतीयांनाच पत्रकार परिषदेत उभं केलं... तर राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या साध्वी कांचनगिरी या थेट बृजभूषण यांच्या पत्रकार परिषदेत दाखल झाल्या आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील अपयशीच ठरला...