Mumbai : गुढीपाडव्याच्या शोभायात्रा होणार का याचा अजूनही संभ्रम ABP Majha

गुढीपाडव्याच्या सणाला अवघे काही तास शिल्लक असताना अजूनही पाडव्याच्या शोभायात्रा होणार का याचा संभ्रम कायम आहे. मात्र या निर्बंधांबाबत आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. एकीकडे राज्य निर्बंधमुक्त होत असताना गिरगावसारख्या भागात मात्र 8 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेय त्यामुळे शोभायात्रा आयोजनावरून चांगलंच राजकारण रंगतंय. मात्र या शोभायात्रा होणार का, याचा निर्णय आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola