Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे तीन मजली इमारत कोसळली, दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही
जळगाव शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधली होती, मात्र मुसळधार पावसाने या इमारतीला तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू दोन महिन्यांपूर्वीच इमारत रिकामी करून गेले. आज झालेल्या पावसाने आज रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषदेने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.