Bharat Jodo Yatra : श्रद्धांजली सभेत फटाके, राहुल गांधी संतापले; काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.. मात्र यावेळी सभास्थळी कुणीतरी फटाके लावले.. एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते तर दुसरीकडे आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती.. या सगळ्या प्रकारावर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचंड संतापले... जाणूनबुजून श्रद्धांजली सभेत कुणीतरी फटाके लावल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला..