Satara News : सातारा: १२ दिवस न झोपता, न बसता पुजाऱ्यांचे कडक उपवास

Continues below advertisement
सातारा (Satara) जिल्ह्यातील म्हसवड (Mhaswad) येथील सिद्धनाथ मंदिरात (Siddhanath Mandir) पुजाऱ्यांकडून एक अनोखी आणि कडक परंपरा जोपासली जात आहे. 'जेव्हा म्हैशासुर नावाचा दैत्य नाथांबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं, तर ते बारा दिवस कंटिन्यू असल्यामुळे आम्ही बारा जण बारा दिवस बारा रात्र खडे उभे राहून उपवास करतो,' अशी माहिती मंदिराज्यातील एका पुजाऱ्याने दिली. दिवाळी पाडव्यापासून सुरू होणारे हे व्रत तब्बल १२ दिवस आणि १२ रात्री चालते. या काळात उपवास करणारे पुजारी, ज्यांना गुरव (Gurav) म्हटले जाते, जमिनीवर न बसता किंवा पाठ न टेकवता उभे राहूनच देवाची आराधना करतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू असून, यामागे श्रद्धा आणि निष्ठेचे मोठे सामर्थ्य असल्याचे मानले जाते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola