Bachchu Kadu : नागपूरहून 11.30 च्या विमानाने शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, कोंडी फुटणार
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत मुंबईत बैठक करणार आहे. 'आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून राज्यभर आंदोलन केलं जाईल,' असा थेट इशारा बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी दिला आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पिकाला हमीभाव, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्र सुरू करणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. याशिवाय, बच्चू कडू यांच्या दिव्यांग, मेंढपाळ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसंबंधीच्या मागण्याही चर्चेच्या अजेंड्यावर आहेत. संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील कोंडी फुटते की आंदोलन आणखी तीव्र होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement