कृषी पंप जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा; 5 लाख 82 हजार शेतकऱ्यांकडून वीजबिल भरणा

राज्यात सध्या वीज बिलांचा प्रश्न गाजत असताना या वीज बिलांची नवी माहिती समोर आली आहे. सरकारच्या कृषी पंप विज जोडणी धोरणानंतर राज्यातल्या सुमारे ५ लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिलं भरली आहेत. यातून महावितरणकडे ५११ कोटी २६ लाख रुपये जमा झालेत. प्रादेशिक कार्यालय विभागानुसार पुणे विभागात सर्वात जास्त २०१ कोटी, कोकण विभागात १७२ कोटी, औरंगाबाद विभागात ९० कोटी तर नागपूर विभागानं ४८ कोटी रुपये भरले आहेत. या भरलेल्या ५११ कोटींवर शेतकऱ्यांना २५६ कोटी रुपयांच्या सवलतीचा लाभ झाला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola