Farmer Protest: कोल्हापुरात ऊस दराचं आंदोलन चिघळलं, कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रक अडवले
Continues below advertisement
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात उसाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे रायगडमध्ये (Raigad) भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने (Shetkari Kamgar Paksha) दिला आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आणि आंदोलन अंकुशचे (Andolan Ankush) कार्यकर्ते साखर कारखान्याकडे जाणारा ऊस अडवत आहेत. साखरेचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनाही उसाचा दर वाढवून मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रायगडमध्ये, शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी किशन जावळे (Kishan Jawale) यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement