Devendra Fadnavis : कव्हर फायरिंग सुरु आहे, फडणवीसांचा ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यावरुन निशाणा

Continues below advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जोरदार टीका केली आहे. 'जर इव्हीएमवर (EVM) विश्वासच नाही तर ते खोटे निवडून आलेले आहेत आणि स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्षनेत्यांपासून महाविकास आघाडीच्या (MVA) सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा,' असे थेट आव्हान फडणवीसांनी दिले आहे. हा निर्धार मेळावा म्हणजे निवडणुकीतील पराभवासाठीचे 'कव्हर फायरिंग' असल्याची टीकाही त्यांनी केली. तर उदय सामंत यांनी हे 'फेक नरेटिव्ह' सेट करण्याचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. निर्धार मेळाव्याने काहीही होणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेवर (BMC) महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola