#EXCLUSIVE सध्या 100 कोटीपेक्षा जास्त डोसची गरज, लसीकरणानंतरच कोरोनावर नियंत्रण : डॉ. राहुल पंडित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरसकट लसीकरण झाले पाहिजे या मागणीने काही दिवसांपासून राज्यात चांगलाच जोर धरला होता. विशेष करून दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांना या कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे सर्वच स्तरावर सरसकट तरूणांमध्ये लसीकरण करा, असे मत व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने सुद्धा तरुणांना लस देणे गरजेचे असल्याचे सांगून थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. अखेर कोरोनाचा वाढता हाहाकार बघता केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेण्याची परवानगी देण्यात आली. या निर्णयाचे सर्व स्तरारून स्वागत करण्यात आले असून, आता कशा पद्धतीने राज्यांना लसीचा पुरवठा होतो, त्याची किंमत किती असणार आहे, हे सर्व पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola