EXCLUSIVE | संचारबंदीचा परिणाम सात दिवसानंतर दिसायला सुरुवात होईल : डॉ. तात्याराव लहाने
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु मागील दोन-तीन दिवसांत कोरोनाबाधितांची वाढतीच आहे. मात्र संचारबंदीच्या सात दिवसांनी रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा विश्वास असा विश्वास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला. तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलत होते.
संचारबंदीमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरु नये. लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी संचारबंदी खूप महत्त्वाची आहे. संचारबंदीचा परिणाम सात दिवसांनी दिसेल. सात दिवसांनी रुग्ण संख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असं तात्याराव लहाने म्हणाले.
"कोरोनाची लक्षणे दिसल्यास ते अंगावर काढू नये. तातडीने उपचार सुरु करावेत. आजार बळावल्यानंतर उपचार करणं कठीण जातं," असंही तात्याराव लहाने यांनी म्हटलं