Pariksha Pe Charcha कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र : ABP Majha
मदुराई केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी हिने पंतप्रधानांना परीक्षेचा ताण, परीक्षेचे दडपण आणि परीक्षेत जास्त गुण मिळवण्याचा दबाव यावर प्रश्न विचारला. तसंच इतर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना विचारले की, परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत, तर कुटुंबाच्या दबावाला कसे सामोरे जायचे? यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं की जसे क्रिकेटमध्ये गुगली म्हणजे लक्ष्य एक आणि दिशा वेगळी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर बाद करु इच्छिता, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.