Zero Hour : आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीनं घेतल्या जाव्यात; जनतेचा कौल काय?

Continues below advertisement
राज्यभरात ईव्हीएम (EVM) आणि मतपत्रिकांवरून (Ballot Paper) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आता सामान्य नागरिकही या चर्चेत सहभागी झाले आहेत. 'नाचता येईना, अंगण वाकडं. EVM चुकीचं असेल तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इथेही ते चुकीचं होतं, असं म्हणण्याचं धाडस दाखवा', असा थेट सवाल करत सुभाष पाटणकर यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे, 'ईव्हीएममध्ये केलेलं मत कुठे जातं याबाबत मला शंका असेल तर मतदान का करावं?', असा प्रश्न विचारत शशांक महाडिक यांनी मतदानाच्या पारदर्शकतेवर चिंता व्यक्त केली आहे. मतपत्रिकेमुळे निवडणुका अधिक पारदर्शक होतील, असे काहींचे म्हणणे आहे, तर काही जणांनी मतपत्रिकेमुळे गैरप्रकार वाढतील, अशी भीती व्यक्त केली आहे. या सगळ्यात, आधी मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या, असाही एक मतप्रवाह समोर येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola