Election Commission | निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचा हल्लाबोल
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस नेत्यांनी आयोगावर जोरदार टीका केली. एका काँग्रेस नेत्याने म्हटले की, निवडणूक आयोगाने सोशल मीडिया विभागाने लिहून दिलेली स्क्रिप्ट खाली मान घालून वाचली आहे. त्यामुळे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून आजचा मुहूर्त काढण्यात आला, असा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगाने अत्यंत जबाबदारीने वस्तुनिष्ठ स्वरूपात चौकशीच्या अनुषंगाने, जबाबदारीने तथ्य आणि सत्य समोर मांडत असताना उत्तर देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करण्यात आले. माध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये चुकीची माहिती पुरवणे, हे निवडणूक आयोगाने केलेले 'पाप' आता उघडकीस आले आहे, असेही म्हटले. निवडणूक आयोगाने हे 'पाप' करू नये, जी वास्तविकता आहे ती लोकांच्या समोर मांडावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. आयोगाने वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली.