Maharashtra Politics: 'मी गद्दारांना उत्तर देत नाही', Uddhav Thackeray यांचा पलटवार
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'हंबर्डा मोर्चा'वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. 'जे कधी उंबरठाही ओलांडत नव्हते ते आता हंबर्डा फोडायला लागले आहेत', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सत्ता आणि खुर्ची गेल्यावरच ठाकरेंनी हंबरडा फोडला, हे शेतकऱ्यांवरील प्रेम म्हणजे 'पुतणा मावशीचं प्रेम' आहे, असंही शिंदे म्हणाले. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, 'मी गद्दारांना उत्तर देत नाही,' असं म्हणत शिंदेवर पलटवार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाने 'हंबरडा मोर्चा' काढला आहे, त्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement