Thackeray Reunion: 'पूर्वी भाऊबंदकी गाजली, आता मनोमिलन नाटक सुरू', Eknath Shinde यांचा टोला
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) संभाव्य युतीवर जोरदार टीका केली आहे. शिंदे म्हणाले, 'पूर्वी भाऊबंदके हे नाटक गाजलं होतं मात्र आता राज्यात मनोमिलन नाटक सुरू आहे.' अंबरनाथ येथील नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेच्या यशाकडे पाहून काही लोकांच्या पोटात दुखत असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या 'सारखं छातीत दुखतंय' या नाटकाचा संदर्भ देत, 'काहींना शिवसेनेचं यश पाहून सारखं पोटात दुखतंय', असं शिंदे म्हणाले. आपण आरोपांना कामाने उत्तर देतो, आरोपांनी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या टीकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement