Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, दिवाळी सुट्टीचा शेवटचा वीकेंड
Continues below advertisement
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून पर्यटक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. ‘सध्या माणगाव शहर ते कळंब या दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत’, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा वीकेंड असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाच्या (Konkan) दिशेने निघाले आहेत. परिणामी, महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. विशेषतः माणगाव (Mangaon) परिसरात परिस्थिती गंभीर असून, पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुट्टीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement