Crime Crackdown: 'गुन्हेगारीला राजाश्रय देणाऱ्यांना सोडणार नाही', Devendra Fadnavis यांचा इशारा
Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 'कोणी कुठल्याही पक्षाचा असो, आता जर कुणी गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही,' असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला. गुन्हेगारीला मिळणारा राजकीय राजाश्रय मोडून काढणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. आगामी निवडणुकांसाठी महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिथे सर्व पक्ष तुल्यबळ आहेत, तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही ते म्हणाले. पुणे येथील एका परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांवर होत असलेले आरोप फेटाळताना, तो परवाना दिलाच गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कॉल सेंटर घोटाळ्याबाबत सीबीआयकडून (CBI) अद्याप कोणताही अहवाल आला नसून, तो आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement