Maharashtra Assembly : सरकारचा त्यांच्याचं आमदारांवर विश्वास नाही, Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड नियम बदूलून घेण्याची महाविकास आघाडीवर वेळ आली आहे. गुप्त मतदान झाले तर सरकारमधील आमदार आपला असंतोष दाखवतील याची सरकाला भीती आहे. राज्य सरकार घाबरलेलं आहे. सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ओबीसी आरक्षण, अतिवृष्टीतील मदत, मुख्यमंत्र्यांची तब्बेत, भास्कर जाधव यांचे वक्तव्य अशा विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासठी होणाऱ्या निडणुकीत राज्य सरकारने केलेल्या बदलावरून फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये असंतोष आहे. गुप्त मतदान घेतले तर ते आपला असंतोष मतदानातून दाखवून देतील. त्यामुळे राज्य सरकार घाबरले आहे. या भीतीमुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बदल करण्यात आले आहेत अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची तब्बेत ठिक नसेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, भाजपचा त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु, ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसतील तर एखाद्या मंत्र्याकडे त्यांनी आपला चार्ज द्यावा" अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram