CBI चोकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई पोलिसांवरील दबाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिले आहेत. आता सीबीआय चौकशी होईपर्यंत आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील हप्तेखोरीला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आळा बसेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्र्यांची चौकशी सीबीआयने करू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार हे स्पष्ट झालं आहे. तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जर ते या चौकशीत निर्दोष सापडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola