Mahayuti Plan BMC Election : मुंबईत एकत्र, राज्यात वेगळं लढून एकत्र येणार
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं आहे. 'निकालानंतर काय करायचे ते ठरवू', असं सूचक विधान फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केलं. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेना-भाजप महायुती म्हणून एकत्र लढणार असले तरी, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. जिथे मित्रपक्षांमध्ये आपापसात स्पर्धा आहे, तिथे वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याचा पर्याय खुला ठेवल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना फायदा होऊ नये, यासाठी महायुतीने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement