Maharashtra Politics : Maha Vikas Aaghadi चे मंत्री ओबीसींना फसवत आहे : Devendra Fadnavis

ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने?, सूत्रांची माहिती हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असल्याच सांगत राज्यपाल यांनी राज्य सरकारकडे कायदेशीर खुलासा मागीतला असल्याचं सूत्रांची माहिती,ओबीसी समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता मागच्या कॅबिनेट मध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. आता तो सहीसाठी राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.मात्र राज्यपाल यांनी राज्य सरकारकडे खुलासा मागितला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरआरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 

संबंधी विरोधीपक्ष नेते Devendra Fadnavis यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola