Sharad Pawar Security | तुम्ही ईडी वापरली, बिडी किंवा काडी वापरली, तरी शरद पवार घाबरणाऱ्यातला गडीच नाही : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, पेगासेस आणि फोन टॅपिंग बद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. भीमा कोरेगाव हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा हा कट आहे. दलित समर्थाकांना बदनाम करायचं आणि आंबेडकरी चळवळ संपवायची हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी सुरू होत आहे म्हणून मी आनंदी आहे.