Delhi Pollution: 'सरकार हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत आहे', इंडिया गेटवर आंदोलकांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
राजधानी दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातला असून, याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. इंडिया गेटवर (India Gate) झालेल्या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. 'दिल्लीचं सरकार हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.' वाढतं प्रदूषण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावाही आंदोलकांनी केला. या आंदोलनादरम्यान, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) परवानगी नसल्याचे कारण देत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये सामान्य नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा समावेश होता, ज्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement