Cyclone Tauktae : पंतप्रधान मोदींनी गुजरात दौरा केला, महाराष्ट्रात का नाही? : नवाब मलिक

Continues below advertisement

तोक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना बसला आहे. पंतप्रधान मोदी गुजरात, दीव-दमणचा दौरा करत आहे. ते महाराष्ट्रात येऊ शकले असते. गोव्याहून सुरुवात केली असती तर फक्त अर्धा तास लागला असता. ते भेदभाव करत आहेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. केंद्रीय पथक येत नाही हा आमचा अनुभव आहे. केंद्रीय पथक आलं असतं, पंतप्रधानांनी दौरा केला असता तर महाराष्ट्राला मदत मिळण्यास फायदा झाला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि मदत याबाबत चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram