Rakeshwar Singh : नक्षलवाद्यांच्या तावडीतून वाघ परतला, अपहरण केलेल्या जवानाची सहा दिवसांनी सुटका
रोमीत तोंबर्लावार, एबीपी माझा
Updated at:
08 Apr 2021 10:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायपूर : नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनहासला सोडलं आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. एबीपी न्यूजशी बोलताना राकेश्वर सिंह यांच्या पत्नी यांनी मीडिया आणि सरकारचे आभार मानले.
राकेश्वर मनहास यांचं 3 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं, त्यानंतर 6 दिवसांनी त्यांना सोडलं आहे. त्यांना सरकारने गठीत केलेल्या 2 सदस्यीय मध्यस्थ पथकाच्या स्वाधीन केलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पद्मश्री धर्मपाल सैनी आणि गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया हे या पथकात होते. जवानासह सर्व जण आता बासागुडा येथे पोहोचणार आहेत.