Coronavirus | Anil Deshmukh | यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही : गृहमंत्री अनिल देशमुख
पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.