Sanjay Nirupam: काँग्रेस नेते निरुपम यांचा घरचा आहेर, राज्य सरकार राज ठाकरेंना घाबरतं ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 May 2022 10:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरतं आणि म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असा घरचा आहेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिलाय. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटतेय आणि त्यामुळे १ मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप निरुपम यांनी केलाय. सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या अटकेची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून राज ठाकरेंवर कारवाई न झाल्याबद्दल निरुपम यांनी नाराजी व्यक्त केलीय..