Uddhav Thackeray UNCUT| संकट कायम, घाईत निर्णय नाही;पंचनामे करुन मदत करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. "परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही," असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिलं.
Tags :
Uddhav Thackeray Uncut CM Uddhav Thackeray UNCUT PC Solapur Political Leaders Tour Maharashtra Flood CM Thackeray Visits Rain Affected Solapur Uddhav Thackeray Devendra Fadnavis