Thackeray VS Fadnavis | पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2021 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. याशिवाय इंधन दरवाढीवरुनही केंद्र सरकारवरही निशाणा साधला. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केलाय. यानंतर फडणवीसांनी पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्दावर प्रत्युत्तर दिलं.