Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | पॅकेजची मागणी करणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर

Continues below advertisement
केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. या मागणीसह विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन देखील केलं होतं. यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आज फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केलं नाही. राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये. पॅकेजची मागणी केली जात आहे. केंद्राकडून पॅकेज देण्यात आलं. पण ते पॅकेज उघडलं, तर त्यात काहीच नाही. तो फक्त रिकामा खोका निघाला. पॅकेज काय घोषित करायचं? जाहिरात करायची की मदत करायची. पोकळं घोषणा करणारं आमचं सरकार नाही. पॅकेज घोषित कशाला करायचं? त्यापेक्षा सरकारनं प्रत्यक्ष मदत करण्याचं कामं केलं आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram