Chiplun Floods: उत्तर रत्नागिरीत पूर, चिपळूण, खेडमध्ये जनजीवन विस्कळीत

सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये तसेच बाजारपेठेत शिरले आहे. प्रतिनिधींनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola