Maharashtra Bandh : 'राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करा', चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
Tags :
Congress Maharashtra News Kolhapur Shiv Sena Ncp Uddhav Thackeray Maharashtra BANDH Ashish Mishra Lakhimpur Kheri Violence Maharashtra Bandh News Maharashtra Bandh Latest News Maharashtra Bandh Tomorrow MVA Maharashtra Bandh Lakhimpur Kheri Violence Case Lakhimpur Kheri Farmers Protest Lakhimpur Kheri Farmers Death