TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 24 Oct 2025 | ABP Majha

Continues below advertisement
इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘शासनाने प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा,’ अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आता आठ ऐवजी दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा प्रस्ताव पुढील दहा दिवसांत सरकारला सादर केला जाईल. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अज्ञात व्यक्तीने द्राक्ष बागेवर तणनाशक फवारल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिकांनी पोलिसांकडे २६ बंदुका स्वाधीन केल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola