Prataprao Jadhav On Sambhaji Bhide:संभाजी भिडेंच्या विधानाशी अंशत: सहमत,प्रतापराव जाधवांचं मत
संभाजी भिडे यांनी काल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की , माझं वैयक्तिक मत असं आहे की , संभाजी भिडे यांनी जे म्हटलं ते अर्धसत्य आहे. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते आपण स्वीकारलं आणि आपण तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली आणि म्हणून तिरंग्याचा सन्मान आपण त्या ठिकाणी करतो. पण ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे की , इंग्रजांनी जाताना अखंड हिंदुस्थानाला स्वातंत्र्य दिलं नाही , तर त्यांनी या हिंदुस्तानाचे दोन तुकडे केले १४ ऑगस्ट ला त्यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिलं आणि १५ ऑगस्ट ला आपल्या भारताला स्वातंत्र्य दिलं. मात्र अखंड हिंदुस्तानाला स्वातंत्र्य मिळालं नाही..