Keshav Upadhyay : मनपाचा प्रभाग आराखाडा जाहीर, उपाध्येय म्हणाले...ठाकरेंचं रडगाणं सुरू होईल
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आज महापालिकेचा प्रभाग आराखडा जाहीर होत असताना, उपाध्ये यांनी म्हटले आहे की, पराभवाचे रडगाणे आळवण्यासाठी ठाकरे गटाला आजपासून नवे निमित्त मिळेल. प्रभाग आराखडा जाहीर होताच अन्याय झाल्याचे सूर उमटू लागतील आणि मतदानाच्या तारखेपर्यंत हा राग लोकांच्या माथी मारला जाईल, असे त्यांनी नमूद केले. पुढे प्रत्यक्ष पराभव दिसू लागला की मतदान यंत्राच्या नावाने नवे सूर मिसळले जातील आणि निवडणूक हरल्यावर 'वोट चोरी'चा Rahul Gandhi यांच्या 'फोकनाड थियरी'चा ताल धरला जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. मुंबईतील २१७ मधील प्रभागांची २२७ हीच संख्या कायम असून रचनेमध्ये फारसा बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. "मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला ठाकरे गटाकडे काही नाही, मग अशी कारणं काढली जाणार?" असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement