Mission 150: 'किमान दीडशे जागा लढवणार', BMC निवडणुकीसाठी BJP चा हिंदुत्वाचा नारा; शिंदे गटाची कोंडी?
Continues below advertisement
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून 'मिशन १५०' जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'भाजप किमान दीडशे जागा लढवणार आहे'. मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपने पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढत 'एक है तो सेफ है' हा नारा देण्याचे ठरवले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 'घर चलो अभियान' आणि हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी 'हिंदू संवाद कार्यक्रम' असे कार्यक्रम राबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही जागांसाठी आग्रही मागणी केल्याने महायुतीत जागावाटपावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement