Gram Panchayat Election Results 2021 | मोदींनी कृषीविषयक घेतलेल्या निर्णयामुळे घवघवीत यश : भाजप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्याचा दावा राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय. भाजपच्या वतीनं 6 हजारांपेक्षा जास्त जागा जिंकल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेनेनं महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भगवा फडकावल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर 80 टक्क्यांहून अधिक धावा महाविकास आघाडीनं जिंकल्याचा दावा करत, हा सरकारच्या कामांचा विषय असल्याचं म्हटलं आहे. अशातच आज भाजपच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सर्वाधिक जागा त्यांनाच मिळाल्या असून जिल्हानिहाय आकडेवारीही सादर करण्यात आली. तसेच आज मुंबईत भाजपकडून संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सहा हजारांहून अधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपच्या वतीनं केला जातोय. केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, "राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळणार. प्रत्येक पक्षाने आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काहीही दावा करू द्यात. माझ्या हातात आता आकडेवारी आहे. त्यानुसार आम्ही राज्यात सहा हजारापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले आहेत. आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो. उगाचच काहीही दावे करत नाही."
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सहा हजारांहून अधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपच्या वतीनं केला जातोय. केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, "राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळणार. प्रत्येक पक्षाने आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काहीही दावा करू द्यात. माझ्या हातात आता आकडेवारी आहे. त्यानुसार आम्ही राज्यात सहा हजारापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले आहेत. आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो. उगाचच काहीही दावे करत नाही."