Mumbai Politics: ठाकरेंच्या मोर्चाला BJP चे 'घरोघरी' उत्तर, आशिष शेलार, अमित साटम यांची नवी रणनीती
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढणार असून त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने (BJP) नवी रणनीती आखली आहे. 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा असा अभियान राबवा', असे निर्देश मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. याअंतर्गत, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधतील आणि भाजपचे विकासाचे व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर, मतदार यादीतील संभाव्य त्रुटी तपासण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement