Beed: भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा घेतला बळी,लहान मुलांवरही वानरांचा हल्ला : Abp Majha

बीडच्या लावूळ गावात उच्छांद मांडणारे ते दोन वानर वनविभागाने ताब्यात घेतलेत. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला होता. भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतल्यानंतर लहान मुलांवरही या वानरांनी हल्ला केला होता. एबीपी माझाने हे वृत्त दाखवल्यानंतर वनविभागाने गावात पाहणी केली होती. त्यानंतर नागपूरवरुन वनविभागाचे पथक गावात दाखल झालं. त्यानंतर या पथकातील कर्मचाऱ्यांनी या वानरांना ताब्यात घेतलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola