Barvi Dam : बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली!

Continues below advertisement

Barvi Dam :  बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! धरणातून ८०० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग आमदार किसन कथोरेंनी केलं जलपूजन ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली! बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे हे धरण ८५ टक्के भरलं होतं. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दडी मारल्यानं हर धरण भरायला उशीर झाला. अखेर गेल्या आठवडाभरात बारवी धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसानं हे धरण पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram