देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर

सातारा : कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत असल्याचा आरोप वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलंय.

सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. तर पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी उगारलेले हे हत्यार डोकेदुखी ठरणार आहे, असे दिसत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola